पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेद मार्गे मुनी गेले....

इमेज
वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालीलो ! भारतीय इतिहासात आपल्याला पाहायला मिळतं की हिंदू धर्मावर परकीय परधर्मीयांची आक्रमणं झाली. बरेचदा अन्याय-अत्याचार किंवा प्रलोभन देऊन हिंदू धर्मियांच्या धर्मांतरासाठी अनेक प्रयत्न झाले.                                           समाज सुधारणेच्या नावाखाली तसेच पुरोगामी विचारसरणीच्या नावाखाली तथाकथित धर्मसुधारकांनी व पुरोगाम्यांनी हिंदू धर्म साकल्याने जाणून न घेता आपल्या अर्धवट बूद्धीद्वारे दोष देण्याचे काम केले.     या परधर्माच्या व नास्तिकतेच्या वावटळातही वेदानुसारी असलेला हा धर्म दीपज्योतीवत् दीप्तीमान राहीला. वेदाप्रमाणेच अनंत काळापासून प्रवाही आहे. आणि पुढेही प्रवाही राहील! म्हणूनच त्यासाठी सनातन हा शब्द वापरला आहे. त्या शब्दातच त्याचं शाश्वतत्व टिकून आहे.         "सर्वे भद्राणि पश्यन्तु" द्वारे सर्व मानवजातीच्या कल्याणाची कामना करणाऱ्या या धर्माने कधीही धर्मवृद्धीसाठी...

सेवेलागी सेवक झालो.....

इमेज
  सेवेलागी सेवक झालो..      महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात दत्त जयंती निमित्ताने वेगवेगळे अध्यात्मिक कार्यक्रम सुरू आहे. त्यानिमित्ताने आमच्या योगवेदांत आश्रमात येणाऱ्या कोकणातील काही मंडळींनी मला काही दिवसांपूर्वी किर्तन सेवेकरिता पाचारण केलं.तसेच मी काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या दोन्ही पेपरसाठी फॉर्म भरलेला होता. असं वाटलं नव्हतं की केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आणि कीर्तनाचा कार्यक्रम एकाच दिवशी येईल. आणि नेमकं तेच झालं. ज्या दिवशी कीर्तन सेवा होती त्याच दिवशी सीटेटचा पेपर आला.आता माझ्यासाठी परीक्षा ही महत्त्वाची होती. आणि कीर्तन सुद्धा. भावी जीवनासाठी परीक्षा तर वारकरी सांप्रदायिक सेवा म्हणून कीर्तन महत्त्वाचे ! एक प्रकारच्या कात्रीत सापडल्यासारखं झालं.  मी असा विचार केला की दोन्ही पेपर कसेबसे पूर्ण करून कीर्तन सेवेकरीता जायचं. परंतु दुसऱ्या पेपरची वेळ दु.२:३०ते ५ अशी होती. त्यामुळे पुण्यातून आळंदीला येऊन पून्हा चाकण आळेफाटा व ओतूर या मार्गाने मुंबईकडे जायचं होतं. आणि हे सगळं वाहतूक कोंडीचा विचार करता अशक्य ...

गीताई माऊली माझी

इमेज
आज गीता जयंती (५१४१वी)..     "गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता l         पडता रडता उचलूनी घेई कडेवरी ll" श्रीमद्भगवद्गीता हे मानवी जीवनाचे सार आहे. जिचे पठण अध्ययन केल्यानंतर आपल्याला योग्य मार्ग निश्चितच आपल्या जीवनामध्ये मिळू शकतो. गीतेचे महत्व टिकून राहावे यासाठीच आपल्या भारतीयांमध्ये गीता जयंती साजरी केली जाते . सनातन हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ असणाऱ्या ग्रंथाची जयंती म्हणजेच गीताजयंती होय. भगवद्गीता हा जीवन मंत्र आहे , म्हणूनच हजारो वर्षांपासून मानवाला पथप्रदर्शन करीत आला आहे. आणि म्हणूनच याला अत्याधिक पवित्र ग्रंथ मानले जाते.       "भगवद्गीता म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्र मध्ये अर्जुनाचा मोह निवृत्त होण्याकरता केलेला उपदेश होय." अर्जुन कुरुक्षेत्रामध्ये , आपल्या नातेवाईकांना पाहिल्यानंतर मोहग्रस्त होतो आणि अशा मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाचा मोह निवृत्त व्हावा म्हणून भगवान जो उपदेश करतात तो गीता होय आणि भगवंतांनी हा उपदेश ज्या दिवशी केला तो दिवस म्हणजे "मार्गशीर्ष शुक्ल एकादशी" अर्थ...